Wednesday, April 15, 2009

प्रवास

संपत नाही प्रवास तोवर चालत जाने
रस्ता म्हणजे जीवन उगाच तुडवत जाने

जाती अन भाषा घेवून बोभारा फुकने
कधी कधी तर ताकतिच्या आधीन जाने

पडला जर प्रकाश असा तेजोमय सुर्याचा
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाने

कसले पानी कसली वाणी वाया आहे सर्व काही
देहाच्या मागण्या अधाशी अश्याच पुरवत जाने

कधी वास सुखाचा न लागो ...रे मानवा
दुःख असेच हे पेरित जाने दुःख असेच हे पेरित जाने

कवी चिमनिताई


Saturday, March 28, 2009

आभाळाचे डोळे ..........


उंच पाहिल्या वर काय दिसतं ?
पहिलं ,पाहिलं अ ह काय दिसतय ?
अ रे हो फक्त आभाळ.....................!
त्याच्यात पाणी असतं ना ....पावसाळा आला की ते ढग पाणी टाकुन जातात ...

माझी आई सांगायची ढग वर वर जातात आणि ठण्ड होतात
मग पाउस पडतो ..टिप टिप आणि थंडगार होते सारे काही .....!

पण एकदा मी आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं
आईला हळूच म्हणालो ,आई ढग खुप वर गेलेत काय ग ?तुझ्या डोळ्यातून टिप टिप पाउस पडतोय

आई म्हणाली नाही रे बाळा...
जेव्हा ढग वर जातात तेव्हा त्यांचं वजन ते कमी करतात ...आणि आपण त्याना पाहिलं की
ढग डोळ्यात जमा होतात आणि डोळे ठण्ड करण्या साठी पाणी तिथेच सोडून जातात ......!!


चिमनिताई.......

निराकार .....


मी आता तुला पाहिले
अन तू मला दिसलास
खुप फिरवलेस ,लपलास
पण तरीही भेटलास ....

पाहिले तेव्हाच समजलो
तू असाच आहेस
निराकार ,निर्गुण
पण तरीही भेटलास .....

तुला डोळे नाही तरीही
तू पाहतोस ,
कान नाही तरीही
तू ऐकतोस ....

देवा विशाल रूप तुझे
असून तू अदृश्य राहतोस
आणि सारे काही पारदर्शी
असून तू अपारदर्श्याचा भास् करतोस

भ्रम आणि ज्ञान
दोन रुपाचा खेळ करतोस
कधी भेटतोस अन कधी हरवतोस
सदगुरु रुपाने दर्शन देतोस .....


चिमनिताई.......

बघ जमतय का ?


पहावे तुला असेच
आंधळ्य़ा डोळ्यांनी
अन बोलावे तुझ्याशी
मुक्याने
बघ जमतय का ?

सारं काही विसरावं
तुला कवेत घ्यावं
र्हुदयाने स्पर्श करावा
अन ऐकावे स्पंदने
बघ जमतय का ?


चिमनिताई.......

प्रार्थना


हे देवा ,निरंकारा
अविनाशी अनंत बहुगुणा
दयालु मालिक ,परमेश्वरा
तू सर्व काही पाहतोस

तुझ्या वाचून काहीच नाही
निरंतरा ,विठ्ठला ,पांडुरंगा
सर्वांचा मालक
तू एकच निराकार आहेस

सुखात काही जन तुला विसरतात
पण तेच दुखात तुला आठवतहि असतात
माणूस आपली कर्म भोगत असतो
चौ ~याएंशी लक्ष्य योन्यां मधून
त्यांचा न्याय निवाड़ा तू करतोस
अशी ही काही मानसं आहेत
जी दुखात ही तुला आठवत नाहित
त्यांच्या जीवनातून तुझे रूप
नष्ट झाले आहे ............
त्यांच्या विचारातून तू निघून गेला आहेस
त्यांचे देखिल भले कर
....



चिमनिताई.......

कवितेची सुरवात ....कविताच कविता


कवितेची सुरवात ....कविताच कविता

माती ,
माती पासून सुरवात होते कवितेची
मातीत पाणी मिसळुन सुरवात होते
माती पासून मडकं अन सुरवात होते
मडकं भट्तित तापुन सुरवात होते

(कुंभार)
कविता इथून सुरवात होते

आग
आगि पासून सुरवात होते कवितेची
आगीशी खेळतात मुले अन सुरवात होते
आगीशी खेलानारी मुले आग असतात
एक नवा जोश असतो अन सुरवात होते

(मुले )
कविता इथून सुरवात होते

हवा
हवे पासून सुरवात होते कवितेची
मौसम पावसाचा ओलिचिंब हवा सुरवातीची
मौसम उन्हाचा कोरडी हवा अन सुरवात होते
मौसम थंडीचा अन सुरवात होते कवितेची

(आनंद )
कविता इथून सुरवात होते

फक्त एक कारण पाहिजे असते कविता करण्या साठी...
मग काय कविताच कविता
माणसाला काय पाहिजे
साडे तिन हाथ जमिन,
अन्न वस्त्र ,निवारा
आणि पाव शेर आनंद अन छटाक भर जीवन
तोच माणूस पुन्हा परतत आहे
आपल्या छोट्या मोट्या गरजाना घेवून
आणि सुरु होते
आणि सुरु होते आणखी एका कवितेची

चिमनिताई.......