Wednesday, September 8, 2010
Friday, August 6, 2010
प्रेम काय आहे ...
का मन झुरते ? का मन रुसते
का मन फसते ....
प्रेम असताना ...
का मनात ठोका ?का मनात झोका
का मन हसते ?
प्रेम असताना ..
का मनाच्या जवळ ?का कधीतरी लांब
का मनात खळबळ
प्रेम असताना ...
का मनात प्रीत ?का भाग उर्वरित
का मनात जळजळ
प्रेम असताना ...
का मनात हौस ?का मनात पाउस
का मन डलमळे
प्रेम असताना ...
माधवी (चिमनिताई )
Thursday, August 5, 2010
वृंदा वनात....
वृंदा वनात छेडिली तार
सुर माझे आले घन न नं न घन नं न नं न
मी व्यथित झाले ..चिंतावले
कोणी छेडिली सतार ..घन न नं न घन नं न नं न
नयन माझे दिपावाले
सामोरी राम अवतारले घन न नं न घन नं न नं न
मन माझे एक पतित उच्चारिले
मीच क्षमा मागुनी स्मरिले घन न नं न घन नं न नं न
नयन माझे झंकारले
सामोरी कृष्ण अवतारले घन न नं न घन नं न नं न
मोहुनी मीरे सम मज घेतले
ह्रुदयात बनुनी राहिले सावकार घन न नं न घन नं न नं न
माधवी ..(चिमनिताई )
सुर माझे आले घन न नं न घन नं न नं न
मी व्यथित झाले ..चिंतावले
कोणी छेडिली सतार ..घन न नं न घन नं न नं न
नयन माझे दिपावाले
सामोरी राम अवतारले घन न नं न घन नं न नं न
मन माझे एक पतित उच्चारिले
मीच क्षमा मागुनी स्मरिले घन न नं न घन नं न नं न
नयन माझे झंकारले
सामोरी कृष्ण अवतारले घन न नं न घन नं न नं न
मोहुनी मीरे सम मज घेतले
ह्रुदयात बनुनी राहिले सावकार घन न नं न घन नं न नं न
माधवी ..(चिमनिताई )
मी तर स्त्री रे ...
कधी मरत मरत ही जगते ...
कधी जगत जगत ही मरते..
मी तर स्त्री रे ...
उष्टी भाकरी कधी कुणाची
दोन घास पोटा पाण्याची ..
मी तर झाड़ा सारखी सुकते रे
मी तर स्त्री रे ...
उसवलेले जीवन माझे
दुखह ,दारिद्र्य धाग्याचे
मी तर शिवते ...सुख दुख्हालाही रे ..
मी तर स्त्री रे ...
कोणी नाही माझे माझे
ना येथे कोणी माझे तुमचे
लचके तोडतात डोळ्यांनी श्वापद रे ..
मी तर स्त्री रे ...
कधी आई .अन कधी बहिन मी
कशी वाचवू लाज मी माझी
धागा राखिचा भावु माझ्या रे
मी तर स्त्री रे ...
मधु (चिमनिताई ) ...
Wednesday, April 15, 2009
प्रवास
संपत नाही प्रवास तोवर चालत जाने
रस्ता म्हणजे जीवन उगाच तुडवत जाने
जाती अन भाषा घेवून बोभारा फुकने
कधी कधी तर ताकतिच्या आधीन जाने
पडला जर प्रकाश असा तेजोमय सुर्याचा
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाने
कसले पानी कसली वाणी वाया आहे सर्व काही
देहाच्या मागण्या अधाशी अश्याच पुरवत जाने
कधी वास सुखाचा न लागो ...रे मानवा
दुःख असेच हे पेरित जाने दुःख असेच हे पेरित जाने
कवी चिमनिताई
रस्ता म्हणजे जीवन उगाच तुडवत जाने
जाती अन भाषा घेवून बोभारा फुकने
कधी कधी तर ताकतिच्या आधीन जाने
पडला जर प्रकाश असा तेजोमय सुर्याचा
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाने
कसले पानी कसली वाणी वाया आहे सर्व काही
देहाच्या मागण्या अधाशी अश्याच पुरवत जाने
कधी वास सुखाचा न लागो ...रे मानवा
दुःख असेच हे पेरित जाने दुःख असेच हे पेरित जाने
कवी चिमनिताई
Saturday, March 28, 2009
आभाळाचे डोळे ..........
पहिलं ,पाहिलं अ ह काय दिसतय ?
अ रे हो फक्त आभाळ.....................!
त्याच्यात पाणी असतं ना ....पावसाळा आला की ते ढग पाणी टाकुन जातात ...
माझी आई सांगायची ढग वर वर जातात आणि ठण्ड होतात
मग पाउस पडतो ..टिप टिप आणि थंडगार होते सारे काही .....!
पण एकदा मी आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं
आईला हळूच म्हणालो ,आई ढग खुप वर गेलेत काय ग ?तुझ्या डोळ्यातून टिप टिप पाउस पडतोय
आई म्हणाली नाही रे बाळा...
जेव्हा ढग वर जातात तेव्हा त्यांचं वजन ते कमी करतात ...आणि आपण त्याना पाहिलं की
ढग डोळ्यात जमा होतात आणि डोळे ठण्ड करण्या साठी पाणी तिथेच सोडून जातात ......!!
चिमनिताई.......
Subscribe to:
Posts (Atom)