कवितेची सुरवात ....कविताच कविता
माती ,
माती पासून सुरवात होते कवितेची
मातीत पाणी मिसळुन सुरवात होते
माती पासून मडकं अन सुरवात होते
मडकं भट्तित तापुन सुरवात होते
(कुंभार)
कविता इथून सुरवात होते
आग
आगि पासून सुरवात होते कवितेची
आगीशी खेळतात मुले अन सुरवात होते
आगीशी खेलानारी मुले आग असतात
एक नवा जोश असतो अन सुरवात होते
(मुले )
कविता इथून सुरवात होते
हवा
हवे पासून सुरवात होते कवितेची
मौसम पावसाचा ओलिचिंब हवा सुरवातीची
मौसम उन्हाचा कोरडी हवा अन सुरवात होते
मौसम थंडीचा अन सुरवात होते कवितेची
(आनंद )
कविता इथून सुरवात होते
फक्त एक कारण पाहिजे असते कविता करण्या साठी...
मग काय कविताच कविता
माणसाला काय पाहिजे
साडे तिन हाथ जमिन,
अन्न वस्त्र ,निवारा
आणि पाव शेर आनंद अन छटाक भर जीवन
तोच माणूस पुन्हा परतत आहे
आपल्या छोट्या मोट्या गरजाना घेवून
आणि सुरु होते
आणि सुरु होते आणखी एका कवितेची
चिमनिताई.......