Saturday, March 28, 2009

प्रेमाविन


जीवनाचा खेळ माझा
नेहमीच नवा रंग घेतो
कधी सुखाच्या कारंज्याचा
तर कधी ज्वालेचे चटके देतो ...!!

आणिबानी कधीही होवे
घाव हृदयावरती होतातच
सुखाचा पाउस येताच मनी
दुखाचे थेंब पड़तातच ....!!

नाहित मित्र शब्द आता
शब्दाविना जगु कसा ?
शरीराचे घाव भरतील पण
मनाला मलहम लावू कसा ?

"कोमलताही" मनाची झाली
वीरघळले त्यात सारे काही
जगने आता कठिन आहे
मरने ही सोपे नाही .....!!

प्रेमाची शब्दे कमी झाली
दुराव्यांनी भग्नं केलि
प्रेमाचं नाव संपले आता
दुखाची लाट आपली केलि


चिमनिताई.......

1 comment:

Unknown said...

chan kavit ahet chimni tai kharach awdlya saglya .................